कार्य आढावा

  • Home
  • कार्य आढावा

कार्य आढावा

  • छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना

    केवळ ५५ दिवसांत ही योजना मंजूर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस व तत्कालीन राज्यमंत्री श्री.अतुल सावे यांनी विशेष प्रयत्नाने रखडलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेचा न्यायालयीन वाद बाजूला ठेवून राज्य सरकारने १६८० कोटी रुपयांच्या नव्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. या योजनेमुळे २०५२ पर्यंत ३३ लाख लोकसंख्येची वाढ गृहीत धरून जायकवाडी धरणातून नव्याने ५०६.४७ दशलक्ष लीटर पाण्याचे आरक्षण मंजूर करून ४० किलोमीटरवर राइजिंग मील उभारून ज्या भागात पाणी चढत नाही अशा भागासाठी स्वतंत्र जलवाहिनीची तरतूद या योजनेत आहे. चार मुख्य ट्रान्समिशन लाइन टाकण्यात येणार आहे. तसेच अस्तित्वात असणाऱ्या २७ टाक्यांबरोबर नव्याने ५२ टाक्या बांधण्यात येणार आहेत. या शिवाय नव्याने १९११ किलोमीटर जलवाहिनी तर ३७९ किलोमीटरची जुनी जलवाहिनीही नव्याने टाकण्यात येणार आहे.

  • वडीलांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा सक्षम वारसा

    अतुल सावे यांचे वडील मोरेश्वर सावे हे हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे बी.कॉम. होते. लातूर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलेले सावे हे व्यवसायाच्या निमित्ताने औरंगाबादेत दाखल झाले. १९८८ च्या निवडणुकीत त्यांनी समर्थनगर वॉर्डातून अपक्ष म्हणून विजय मिळवला आणि नंतर ते शिवसेनेत दाखल झाले. सावे पुढे शिवसेनेच्या पाठिंब्यावर १९८९-९० या काळात छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर बनले. त्यांंनी १९८९ ते ९१ व १९९१ ते ९६ असे लागोपाठ दोन वेळा लोकसभेत छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधित्व केले. तसेच बाबरी मशीद प्रकरणात ते लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सहआरोपी होते.

  • सहकारी मंत्री म्हणून जोरदार सुरुवात

    राज्याच्या सहकार मंत्री म्हणून नियुक्ती होताच त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. ज्यात ऊस गाळप हंगाम त्यांनी १५ दिवस आधी सुरू केला. जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवाच्या ऊसाचा पूर्ण गाळप व्हावा. त्याबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहनपर लाभाच्या वितरणाबाबत जिल्हानिहाय बैठका घेतल्या.

  • सहकार क्षेत्राला संपूर्ण संगणकीकरण करण्याचा मानस

    केंद्रीय सहकार मंत्री श्री.अमितभाई शहा यांचा महत्वकांक्षी संकल्प असलेला संपूर्ण संगणकीकरण योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील संस्थांची माहिती घेऊन त्यांना संगणकीकरण करण्याचा त्यांचा मानस आहे.

  • कौशल्यपूर्ण नेतृत्व

    प्रत्येक काम कौशल्यपूर्णरित्या पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. स्वतः उच्चशिक्षित असल्याने त्यांना प्रत्येक प्रश्नांची योग्य जाण आहे. तसेच कार्य कौशल्यपूर्ण रित्या पूर्ण होण्यासाठी संबंधित क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन घेतात.

  • कचरा व्यवस्थापन

    शहरवासीयांच्या पाठबळामुळे अनेक महत्त्वपूर्ण विषय अतुल सावे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ९० कोटी रुपयांना मंजुरी मिळवून शहराला कचरामुक्त केले तसेच अस्वच्छतेला दूर सारून विकासाकडे एक सक्षम पाऊल टाकण्यात त्यांचे आमूलाग्र योगदान आहे.

  • महाआरोग्य शिबीर

    आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे व त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवणे हे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. अनेकदा पैशाअभावी गरीब रुग्ण आपल्या आरोग्यावर साधा उपचार देखील करू शकत नाही. म्हणूनच अतुल सावे यांच्यातर्फे प्रतिवर्षी वाढदिवसानिमित्त समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी अतुल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एक नवीन उपक्रम असून २ वर्षापासून नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत आहेत. प्रत्येक रुग्णाची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी तसेच मोफत औषधी व नेत्र रुग्णांसाठी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे शकडो रुग्णांवर मोठ्या शास्त्रकियाही मोफत करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत जवळपास २५००० पेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

  • सांडपाण्याचे व्यवस्थापन

    नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या इतर विकास कामांप्रमाणेच स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी सांडपाण्याचा निचरा आणि त्याचे सुयोग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. कारण सांडपाण्याची व्यवस्था व विल्हेवाट योग्य प्रकारे लागली नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच यादृष्टीने खबरदारी म्हणून अतुल सावे यांनी आपल्या मतदारसंघात सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन केले आहे. आमदार स्थानिक विकास निधी मधून भारतनगर, शिवाजीनगर येथे ४३ लाख रुपयांच्या ३००० मीटर लांबीच्या नवीन ड्रेनेज लाईन तसेच विनायक कॉलनी, जय भवानी नगर येथे नवीन ड्रेनेज लाईन बसविण्यात आल्या. पुंडलिक नगर, मातोश्री नगर, गजानन नगर, येथील ड्रेनेजचे घाण पाणी हे पहाडे कॉर्नर येथे रोडवर साचते त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले, मंदिरात जाणारी वृद्ध नागरिक तसेच रोज कामासाठी जाणाऱ्या सर्व नागरिक व महिलांना त्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत असे. त्यासाठी संबंधित ठिकाणी ड्रेनेजची टिकाऊ आणि सुयोग्य व्यवस्था करण्यात आली.

  • विद्युत पुरवठा व वीज व्यवस्थापन

    अनेक ठिकाणी जुन्या विद्युत वाहक तारांमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. म्हणूनच विद्युत वाहक तारा वेळोवेळी बदलणे त्याचप्रमाणे इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असते. म्हणूनच शहरातील पुंडलिक नगर अंतर्गत न्यू हनुमान नगर गल्ली नंबर 3, गल्ली नंबर ४ येथे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न जुन्या विद्युत तारा बदलून नवीन AV केबल टाकून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्याच प्रमाणे इतर अनेक ठिकाणी विजेची कामे मोठ्या प्रमाणात विजेची सुविधा निर्माण करून देण्यात आली.

  • वृक्षारोपण

    वाढत्या आधुनिकीकरणामुळे वने व जंगले संपुष्टात आली आहे. प्रदूषणामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी वेळीच खबरदारी म्हणून वृक्षारोपण हा एक सुयोग्य उपाय आहे. वन विभाग व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार तर्फे इकॉटास कोर्स बटालियनचा भव्य शुभारंभ करण्यात आला व याद्वारे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली आहे.

  • क्रीडा

    मोबाईल, इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या काळात मैदानी खेळ फारच कमी झाले आहेत. परंतु मुलांच्या शारीरिक वाढ व आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असतात. त्यासाठी शहरात प्रोत्साहक अशा सोयीसुविधा निर्माण करण्याचा करण्याचा प्रयत्न केला.यात टेनिस ग्राउंड, अनेक ठिकणी ओपन जिम, उद्यानात खेळण्याचे साहित्य, क्रीडा संकुलांसाठी मोठे योगदान देण्यात आले.

सामाजिक योगदान

संभाजीनगरच्या सामाजिक विकास कार्यात अतुल सावे यांचे मोठे योगदान आहे. रस्ते, वीज, उद्योगधंदे, पर्यावरण, युवा सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, आरोग्य इत्यादी विकास कामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाजातील युवकांचे एकीकरण व्हावे या दृष्टिकोनातून दहीहंडीचा मोठा उत्सव दर वर्षी साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील हजारो युवक एकत्र येतात. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये विविध देखावे, प्रबोधनाचे कार्यक्रम यामार्फत सामाजिक जागृतीचे कार्य ही मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण व्हावे, महिलांनी एकत्र यावे, महिला संघटन वाढावे या दृष्टिकोनातून अतुल सावे यांच्या सौभाग्यवती अंजली सावे यांच्यातर्फे हळदी-कुंकवाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. शहरातील शेकडो माता-भगिनींना एकत्र जमवुन हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात दरवर्षी पार पडतो.

कचरा व्यवस्थापन

शहरवासीयांच्या पाठबळामुळे अनेक महत्त्वपूर्ण विषय अतुल सावे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ९० कोटी रुपयांना मंजुरी मिळवून शहराला कचरामुक्त केले तसेच अस्वच्छतेला दूर सारून विकासाकडे एक सक्षम पाऊल टाकण्यात त्यांचे आमूलाग्र योगदान आहे.

महाआरोग्य शिबीर

आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे व त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवणे हे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. अनेकदा पैशाअभावी गरीब रुग्ण आपल्या आरोग्यावर साधा उपचार देखील करू शकत नाही. म्हणूनच अतुल सावे यांच्यातर्फे प्रतिवर्षी वाढदिवसानिमित्त समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी अतुल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एक नवीन उपक्रम असून २ वर्षापासून नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत आहेत. प्रत्येक रुग्णाची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी तसेच मोफत औषधी व नेत्र रुग्णांसाठी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे शकडो रुग्णांवर मोठ्या शास्त्रकियाही मोफत करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत जवळपास २५००० पेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

सांडपाण्याचे व्यवस्थापन

नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या इतर विकास कामांप्रमाणेच स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी सांडपाण्याचा निचरा आणि त्याचे सुयोग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. कारण सांडपाण्याची व्यवस्था व विल्हेवाट योग्य प्रकारे लागली नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच यादृष्टीने खबरदारी म्हणून अतुल सावे यांनी आपल्या मतदारसंघात सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन केले आहे. आमदार स्थानिक विकास निधी मधून भारतनगर, शिवाजीनगर येथे ४३ लाख रुपयांच्या ३००० मीटर लांबीच्या नवीन ड्रेनेज लाईन तसेच विनायक कॉलनी, जय भवानी नगर येथे नवीन ड्रेनेज लाईन बसविण्यात आल्या.

पुंडलिक नगर, मातोश्री नगर, गजानन नगर, येथील ड्रेनेजचे घाण पाणी हे पहाडे कॉर्नर येथे रोडवर साचते त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले, मंदिरात जाणारी वृद्ध नागरिक तसेच रोज कामासाठी जाणाऱ्या सर्व नागरिक व महिलांना त्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत असे. त्यासाठी संबंधित ठिकाणी ड्रेनेजची टिकाऊ आणि सुयोग्य व्यवस्था करण्यात आली.

विद्युत पुरवठा व वीज व्यवस्थापन

अनेक ठिकाणी जुन्या विद्युत वाहक तारांमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. म्हणूनच विद्युत वाहक तारा वेळोवेळी बदलणे त्याचप्रमाणे इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असते. म्हणूनच शहरातील पुंडलिक नगर अंतर्गत न्यू हनुमान नगर गल्ली नंबर 3, गल्ली नंबर ४ येथे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न जुन्या विद्युत तारा बदलून नवीन AV केबल टाकून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्याच प्रमाणे इतर अनेक ठिकाणी विजेची कामे मोठ्या प्रमाणात विजेची सुविधा निर्माण करून देण्यात आली.

वृक्षारोपण

वाढत्या आधुनिकीकरणामुळे वने व जंगले संपुष्टात आली आहे. प्रदूषणामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी वेळीच खबरदारी म्हणून वृक्षारोपण हा एक सुयोग्य उपाय आहे. वन विभाग व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार तर्फे इकॉटास कोर्स बटालियनचा भव्य शुभारंभ करण्यात आला व याद्वारे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली आहे.

क्रीडा

मोबाईल, इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या काळात मैदानी खेळ फारच कमी झाले आहेत. परंतु मुलांच्या शारीरिक वाढ व आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असतात. त्यासाठी शहरात प्रोत्साहक अशा सोयीसुविधा निर्माण करण्याचा करण्याचा प्रयत्न केला.यात टेनिस ग्राउंड, अनेक ठिकणी ओपन जिम, उद्यानात खेळण्याचे साहित्य, क्रीडा संकुलांसाठी मोठे योगदान देण्यात आले.